Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 31, 2013 - 09:00:31 AM


Title - प्लॅटफॉर्म विस्ताराने वेटिंग संपणार
Posted by : Mafia on Jul 31, 2013 - 09:00:31 AM

कोल्हापूर

शहरात रेल्वे आली आणि थांबली. शहराच्या विकासात रेल्वेचा मोठा वाटा आहेच. पण थांबलेल्या रेल्वेमुळे काही अडचणीही निर्माण झाल्या. त्यामुळे आता या रेल्वेच्या सर्वंकष विस्ताराची गरज आहे. मार्केट यार्डातील मोठी जागा त्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण केल्यास एक गाडी स्थनकात आल्यानंतर दुसऱ्या गाडीला करावे लागणारे वेटिंग थांबणार आहे.

कोल्हापूर शहरात असलेले रेल्वे स्थानक आता छोटे पडू लागले आहे. दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि आवश्यक सुविधांना जागा कमी पडत असल्याने विस्तार करणे अवघड झाले आहे. यामुळे रेल्वे स्थानक मार्केट यार्डासारख्या मोठ्या भागात स्थलांतरीत झाले तर आणखी विकसित करण्याची संधी आहे. त्यामुळे जादा लाइन उपलब्ध होतील.

प्लॅटफॉर्म विस्तारीकरणानंतर ओव्हरब्रिजची गरज लागणार नाही. त्याबरोबरच शहरातील सध्याचे स्टेशन ऐतिहासिक ठिकाण म्हणूनही विकसित करता येईल. त्यासाठी शहरापर्यंत येण्यासाठी एक ट्रॅकही ठेवता येईल. त्या ट्रकवरून रेल्वे शहरात येऊ शकेल. ते स्टेशनही बंद पडणार नाही आणि स्टेशन विकसित होण्याच्या दृष्टीने मार्केटयार्ड चांगला पर्याय ठरेल.

मार्केट यार्डमध्ये विकासासाठी

मोठ्या संधी आहेत. त्याठिकाणी काही झोपडपट्टीचा भाग आहे. तोही विकसित होऊ शकतो. रेल्वे त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणच्या परिसराचाही विकास होणार आहे. बाजारपेठ विकसित होईल. या भागात असणाऱ्या उद्योगांना देखील मार्केट यार्डातील स्टेशन फायदेशीर ठरणार आहे. सध्या या भागात १० कारखाने आहेत. या ठिकाणी असलेल्या मालवाहतुकीलारेल्वेचा फायदा होतोच. मात्र, तयार माल बाहेर पाठविण्यासाठी सोयीस्कर ठिकाण होईल अशी अपेक्षा आहे.

एका बाजूला मालवाहतूक आणि दुसऱ्या बाजूला प्लॅटफॉर्म वाढवणे हे दोन्ही करणे शक्य आहे. आता वाढत्या वेगाने मार्केट यार्डही शहरापासून लांब राहिलेले नाही. दळणवळणाच्या साधनांमुळे ते शहरातच आल्यासारखे आहे. या सर्वांचा विचार होता मार्केट यार्डातील रेल्वे स्टेशन विस्तार आणि विकासाच्या दृष्टीने केंद्रबिंदू ठरेल.