Indian Railways News => Topic started by railenquiry on May 24, 2013 - 18:00:32 PM


Title - रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवादाविरोधात शपथ
Posted by : railenquiry on May 24, 2013 - 18:00:32 PM

नागपूर - "आम्ही निष्ठापूर्वक शपथ घेतो की, आम्ही हिंसा आणि आतंकवादाचा विरोध करून चिरंतन सौख्य मिळण्याची खात्री असलेल्या अहिंसेच्या सन्मार्गावर चालू आणि असंख्य दुर्दैवी प्रसंग टाळण्यात समर्थ ठरू,' अशी शपथ मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घेतली. "दहशतवाद विरोधी दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (ता. 21) मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाच्या रेल्वे पटांगणात हा कार्यक्रम पार पडला.

मध्य रेल्वे मंडळाचे वभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी रेल्वेच्या नागपूर मंडळातील कर्मचाऱ्यांना दहशतवादाविरोधात उभे राहण्याची शपथ दिली. अहिंसेच्या मार्गावर चालण्याच्या सन्मार्गाची शपथ दिली. गेल्या काही वर्षांत दहशतवादाने भयावह रूप धारण केले आहे. देशाची राजधानी दिल्लीपासून तर आर्थिक राजधानी मुंबई, सांस्कृतिक राजधानी पुणेसह देशातील कोलकाता, चेन्नई आणि अन्य शहरांमध्ये दहशतवादी हल्ले झाले आहेत. दहशतवादाला मुळासकट संपविण्यासाठी ठोस उपाययोजनांची आणि कृती आराखड्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक नागरिकांनी दहशतवादाचा विरोध करावा हीच प्रेरणा दहशतविरोदी दिनाला आयोजित कार्यक्रमातून देण्यात आली. ही सुरुवात रेल्वेच्या नागपूर मंडळातून झाली, याचा विशेष अभिमान असल्याचे दीक्षित म्हणाले. तर देशाच्या सीमेवरील सुरक्षाव्यवस्था चोख असावी, यातून सुरक्षा सांभाळली जाते; परंतु सोबतच रेल्वे प्रवाशांनाही जागृत करण्याचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांनी करावे, असे आव्हान दीक्षित यांनी केले. यावेळी वरिष्ठ विभागीय कर्मिक अभियंता बी. के. पाणीग्रही, वरिष्ठ विभागीय मंडळ व्यवस्थापक साळवे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता राजेश द्विवेदी, विभागीय अभियंता विलास पैठणकर, सहायक कर्मिक अधिकारी रमेश अय्यर, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात रेल्वेचे कर्मचारी शपथविधी सोहळ्यास सहभागी झाले होते.